तुरीच्या दाण्यांची हिरवी भाजी ( घेंगा)

by Vaishali Chaudhari

तुरीच्या दाण्यांची हिरवी भाजी ( घेंगा)


प्रस्तावना::

तुरीच्या दाण्याची भाजी ही सीजनल भाजी असून दाण्याची भाजी अत्यंत चवदार लागते. या भाजीमध्ये कांद्याचा वापर असल्यामुळे भाजी अत्यंत चवदार लागते.


साहित्य::

  • एक वाटी तुरीचे दाणे
  • एक कांदा चार हिरव्या मिरच्या
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • आठ ते दहा खोबऱ्याचे काप
  • कोथिंबीर
  • जिरे मोहरी
  • हळद
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ
  • गरम मसाला
  • पाणी


कृती::


तुरीचे दाणे सोलून घ्या. एक वाटी दाणे होतील इतके दाणे घ्या. तवा गरम करा त्यावर थोडे तेल घाला .

आणि तुरीचे दाणे पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीचे दाणे घालून त्याचा जाडसर भरडा करून घ्या.


चटणीची कृती::

तवा गरम करून त्यावर हिरव्या मिरच्या भाजून घ्या कांदा चिरून घ्या आणि कांदाही चांगला काळपट तांबूस रंगावर भाजून घ्या.

खोबऱ्याचे आठ ते दहा काप भाजून घ्या. हे सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे, भाजलेल्या मिरच्या घालून त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि कोथिंबीर घाला याचे बारीक चटणी करून घ्या. आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे.


कढईमध्ये तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घाला त्यामध्ये चटणी घाला .

चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतावा चटणी मध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पूड घाला.

चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवा चटणी सतत मिक्स करत रहा चटणी ला तेल सुटले की त्यामध्ये तुरीच्या दाण्यांचा भरडा घाला.

त्यामध्ये साधारण दोन वाट्या गरम पाणी घाला. किंवा आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या प्रमाणात पाहिजे.

त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो म्हणजे भाजी किती पातळ हवी त्यानुसार पाणी घाला. आता भाजीला दोन ते तीन उकळ्या येऊ द्या .

त्यावर अर्धवट झाकण ठेवा. आता चवीप्रमाणे मीठ घाला भाजीला पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या आणि गॅस बंद करा.

आता आपली तुरीच्या दाण्यांचा घेंगा तयार झालेला आहे . ही भाजी तुम्ही पोळी किंवा ज्वारीची भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतात.

टिप्स::

यामध्ये भाजीच्या चटणी मध्ये घट्टपणा आणण्यासाठी तुम्ही दहा ते बारा शेंगदाण्याचा वापर करू शकतात.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण: २ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.