साखरेच्या तिळाच्या वड्या

by Vaishali Chaudhari

साखरेच्या तिळाच्या वड्या


प्रस्तावना::


तिळाच्या वड्याचा सर्वच बनवतात. पण त्या साखरेच्या बनवाव्या की गुळाच्या …गुळाच्या बनवताना जरा कठीण जाते त्यामुळे आता आपण बघणार आहोत साखरेची वडीची सोपी अशी पद्धत आणि खमंग अशा साखरेच्या तिळाच्या वड्या होतात.


साहित्य::


१ वाटी साखर
१ वाटी तीळ
१ चमचा तूप

कृती::


सर्वप्रथम तीळ चाळून गाळून व्यवस्थित निवडून घ्या. कारण तीळमध्ये खडे असतात. त्यामुळे आपली वडी कचकच लागू शकते.

आता हे तीळ कढई गरम करून त्यामध्ये खरपूस अशी भाजून घ्या. म्हणजे त्यातील कचवटपणा निघून जाईल आणि त्याची वडी खमंग बनेल.

कढई गॅसवर तापवून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा तूप घाला.. तूप वितळले की त्यामध्ये एक वाटी साखर घाला.

ही साखर सारखी परतवत राहा साखरेला पाणी सुटले की हळूहळू साखर वितळायला सुरुवात होईल. आणि साखरेचा पाक होईल. साखरेचा पाक थोडा तांबूस रंगाचा होईल. साखरेचा पाक जास्त पक्का करायचा नाही.

नाहीतर त्याची पुन्हा साखर तयार होईल. साखरेचे पाणी पूर्णपणे झाले की मग त्यामध्ये भाजलेले तीळ घाला.

भरलेली तीळ घातल्यानंतर मिश्रण अल्टी पलटी करून घ्या. गॅस बंद करून घ्या आणि मिश्रणाचा सराटा च्या साह्याने गोळा करा.

आता ओट्याला तुपाचा हात फिरवून घ्या. तसेच लाटण्यालाही तुपाचा हात लावून घ्या. कारण लाटण्याला मिश्रण चिपकणार नाही.

आता हा गोळा तूप लावलेल्या भागावर घाला आणि हाताने व्यवस्थित गोल करून घ्या आता लाटण्याच्या साह्याने त्याची पोळी लाटून घ्या.

पोळी एकदम बारीक सर लाटावी. लगेचच सुरीच्या साह्याने त्यावर आपल्याला हव्या त्या आकाराच्या रेषा मारून घ्या.

आणि हळूहळू वड्या पाडत घ्या. नंतर सराटाच्या साह्याने वर उचकवून त्याच्या वड्या पाडून घ्या.

(आपल्याला शक्य तेवढी ही पोळी बारीक लाटायला हवी
आणि ही पोळी थंड होऊ देऊ नये कारण थंड झाल्यावरती लांबत नाही मग वड्या जाड असला राहून जातील. ही साखरेची वडी अत्यंत खमंग बनतात.)

ही वडी बनवताना पाक अगदी सोप्या पद्धतीने बनवला जातो म्हणून गुळापेक्षा साखरेची वडी पटकन तयार होते…चला तर मग एन्जॉय करूया तिळाची वडी…..


टिप्स::


साखरेचे पाणी झाल्यानंतर पाक झाला असे समजावे लगेचच त्यामध्ये आपण भरलेले तीळ घालतो. पाक झाला की नाही याची काळजी करावी लागत नाही.


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ २० मिनिटे
परिमाण::३ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.