सेंद्रिय गुळ पावडर लाडू

by Vaishali Chaudhari

सेंद्रिय गुळ पावडर लाडू


प्रस्तावना:::


सेंद्रिय गुळाचे लाडू हे अत्यंत पौष्टिक असून त्या कुळामध्ये कुठल्याही केमिकल वापरले गेलेले नसते. त्यामुळे ती शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असते त्यामुळे शरीराला कुठल्याही अपाय होत नाही.

साहित्य:

  • १ वाटी तीळ
  • १ वाटी सेंद्रिय गुड पावडर पाच ते सहा खडे पिवळ्या गुळाचे
  • १ वाटी तूप


कृती:

सर्वप्रथम तीळ निवडून स्वच्छ करून घ्या. गॅसवर कढई गरम करा त्यामध्ये तीळ खरपूस अशी भाजून घ्या.

तीळ गरम गरम असतानाच आपण त्याचा वापर करणार आहोत. कडे मध्ये थोडा गुळ गरम करून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ घालून फिरवून घ्या.

नंतर त्यामध्ये गरम गरम अशी तीळ घाला. आणि मिक्सरवर सिम सिम असे फिरवून घ्या. हे मिश्रण पूर्ण गरम झालेले असेल त्यामुळे गूळ वितळून त्याचा गोळा तयार होईल.

हे मिश्रण डिश मध्ये काढून घ्या. मिश्रण जर घुगरं वाटत असल्यास त्याचे लाडू वळणार नाही. या मिश्रणामध्ये तूप वितळवून त्यामध्ये तूप घाला.

आता त्याचे लाडू वळून घ्या. आपल्याला जर त्यामध्ये तूप घालायचं नसेल जर लाडू वळत असल्यास डायरेक्ट पण लाडू वळले तरी चालतील.

येथे पण दुधाचा वापर करू शकतो पण दूध घातल्यास लाडू जास्त दिवस टिकत नाही.(एका कुकरमध्ये डिश ठेवून त्यावर गुळाचा डब्बाठेवा.

डब्याला झाकण आवश्यक आहे. कारण गुळामध्ये पाणी घुसता कामा नये.डब्यामध्ये गुळ घालून एक शिट्टी घेऊन घ्या.

या पाकामध्ये सुद्धा तुम्ही तीळ घालून मऊ लाडू वळून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे.) पण हे लाडू मी पाप न करताच केलेले आहे हे लाडू ही अत्यंत मऊ होतात.

चवीलाही एकदम छान लागतात. कारण यामध्ये नैसर्गिक गुळाचा वापर केलेला आहे. नैसर्गिक गुळाला एक त्याची स्वतःची वेगळी चव असते त्यामुळे ते लाडूलाही चव येते.


टिप्स::


लाडू मध्ये दूध घालण्याऐवजी खूपच घाला आणि शक्य तेवढं गरम गरम केळीचा वापर करा म्हणजे दूध आणि तूप या दोघांचाही वापर करावा लागणार नाही.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण:३ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.