हिरवी उडदाची डाळ

by Vaishali Chaudhari

हिरवी उडदाची डाळ


प्रस्तावना ::-


हिरवी उडदाची डाळ ही खान्देशी भागातील भाजी असून चवीला फारच छान लागते. ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते


साहित्य::-

  • अर्धा कप उडदाची डाळ
  • दोन टेबलस्पून हरभरा डाळ
  • एक बारीक चिरलेला कांदा
  • पंधरा ते वीस खोबऱ्याचे काप
  • आठ हिरव्या मिरच्या
  • एक टेबलस्पून धने,
  • एक टेबलस्पून गरम मसाला
  • दोन चिमूट हळद
  • आठ लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रक तुकडा
  • फोडणीसाठी तेल
  • कोथिंबीर
  • पाणी
  • चवीप्रमाणे मीठ


कृती:

प्रथम उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि ज्याप्रमाणे आपण वरण शिजवतो.

त्याप्रमाणे कुकरमध्ये चार ते पाच शिट्या घेऊन शिजवून घ्या.

तव्यावर कांदा आणि खोबरं चांगले काळसर होईपर्यंत भाजून घ्या.

हिरव्या मिरच्या आणि धने सुद्धा भाजून घ्या.

मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची भाजलेला कांदा, खोबरं, लसूण अद्रक भाजलेले धने आणि पाणी टाकून त्याचे वाटण करून घ्या.

बारीक अशी चटणी करून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालून चटणी घाला.

चटणी मध्ये हळद आणि गरम मसाला घालावा आणि चटणी चांगली परतून घ्यावी.

चटणीला तेल सुटले की चटणी परतली गेली आहे.

उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळीचे मिश्रण थोडे वरणाप्रमाणे घोटून घ्यावे.

हे मिश्रण चटणी मध्ये घालून व्यवस्थित एकत्र करावे. आता आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालावे.

त्यानंतर भाजीत चवीप्रमाणे मीठ घालावे.

भाजीवर अर्धे झाकण ठेवावे भाजीला तीन-चार उकड्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करावा.

आता आपली हिरवी उडदाची डाळ तयार आहे.


टिप्स:

कुठलीही पातळ भाजी करताना नेहमी झाकण ठेवताना अर्धेच ठेवावे नाहीतर त्यावरील तेल भाजीतच मिक्स होऊन जाते. भाजीला तरंग येत नाही.


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: १ तास
परिमाण: ५ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.