हिरवी ढेमशाची भाजी (गोल भेंडी)

by Vaishali Chaudhari

हिरवी ढेमशाची भाजी (गोल भेंडी)


प्रस्तावना:-

हिरवी भाजी ही रोजच्या जेवणात खाल्ली जाणारी भाजी आहे. ही भाजी साधारण उन्हाळ्यात मिळते.


साहित्य:-


पाव किलो ढेमसे(२५०gm),२ चमचे हरभऱ्याची डाळ
६ हिरव्या बारीक मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, ७ लसूण पाकळ्या, दोन चिमूट हळद, दोन चिमूट गरम मसाला, फोडणीसाठी तेल, चवीप्रमाणे मीठ , पाणी ,कोथिंबीर

  • पाव किलो ढेमसे(२५०gm)
  • २ चमचे हरभऱ्याची डाळ
  • ६ हिरव्या बारीक मिरच्या
  • अर्धी वाटी शेंगदाणे,
  • ७ लसूण पाकळ्या,
  • दोन चिमूट हळद,
  • दोन चिमूट गरम मसाला,
  • फोडणीसाठी तेल,
  • चवीप्रमाणे मीठ ,
  • पाणी ,
  • कोथिंबीर


कृती:


प्रथम ढेमसे बारीक चिरून घ्या. ते स्वच्छ धुऊन घ्या. हरभऱ्याची डाळ ही धुवून घ्या.

कुकरमध्ये ढेमसे आणि हरभऱ्याची डाळ चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.

तव्यावर हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घ्यावे.

मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण पाकळी, कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण करून घ्यावे. चटणी एकदम बारीक वाटावी.

एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घालून त्यामध्ये चटणी घालावी.

चटणी घातल्यावर हळद गरम मसाला घालून चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवावी.

चटणीला तेल सुटल्यानंतर ढेमसे आणि उकडलेले हरभऱ्याची डाळ चे मिश्रण पाण्यासकट त्यात घालावे.

ती व्यवस्थित एकत्र करावे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालावे.

भाजी पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे.

पाणी घालायची गरज पडत नाही कारण ढेमसे आणि हरभऱ्याच्या डाळीच्या उकडलेल्या मिश्रणात पाणी असते.

ते मिश्रण आपण पाण्यासकट चटणीत घालतो. भाजी वर झाकण ठेवावे.

चार ते पाच उकळ्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करावा. दिवसाची हिरवी भाजी तयार आहे.

टिप्स:-

ढेमशाच्या हिरव्या भाजीमध्ये आपल्याला आवडत असल्यास हरभऱ्याच्या डाळ ऐवजी चवळी ही घालू शकतात.

वेळ व परिमाण:


तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: ४५ मिनिटे
परिमाण: ५ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.