खान्देशी मसालेदार शेव भाजी

by Vaishali Chaudhari
0 views

मसालेदार शेव भाजी

प्रस्तावना:::

खानदेशी शेव भाजी म्हटली म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते… शेव भाजीचे बरेचसे प्रकार आहे आपण ही आज खानदेश स्पेशल शेव भाजी बघणार आहे…

साहित्य::

  • एक वाटी शेव
  • दोन मोठे कांदे
  • एक टोमॅटो
  • पाच ते दहा लाल मिरच्या
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • 15 ते 20 खोबऱ्याचे काप
  • कोथिंबीर
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा धनापूड
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • चवीप्रमाणे मीठ
  • फोडणीसाठी तेल, जिरे ,मोहरी

कृती:::

दोन कांदे कापून घ्या.. गरम तव्यावर कांदा चांगला खरपूस भाजून घ्या कांदा तंबूस रंगावर झाला की गॅस बंद करा..

खोबऱ्याचे काप सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या… लाल मिरच्या सुद्धा खरपूस अशा भाजून घ्या…

आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं लाल मिरच्या, लसूण पाकळ्या तसेच अद्रकाचा तुकडा पाच मिरे पाच लवंग घालून बारीक असे वाटण करून घ्या त्यामध्ये थोडे पाणी घाला म्हणजे बारीक अशी चटणी तयार होईल…

आता आपली लाल चटणी तयार झालेली आहे… टोमॅटो बारीक चिरून घ्या…

एका कढईमध्ये तेल घाला.. तेल कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये जिरे मोहरी घाला… तेजपांनाचे तुकडे करून घाला..चिरलेला टोमॅटो घाला आणि परतून घ्या…

त्यानंतर त्यामध्ये केलेली चटणी घाला आणि चटणी व्यवस्थित चांगली परतवून घ्या..

आता चटणी मध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनापूर घालून व्यवस्थित परतून घ्या.. आणि चटणीला चांगले तेल सुटू द्या… चटणीला छानसे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास गरम उकळते पाणी घाला…

भाजीमध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर भाजीला उकड्या येऊ द्या…. चवीप्रमाणे मीठ घाला…

कोथिंबीर चिरून घाला… भाजीला चांगला पाच ते सहा उकड्या येऊ द्या…

त्यानंतर त्यामध्ये एक वाटी शेव(इथे पिवळसर गाठी शेवचा वापर मी केलेला आहे.. ही शेव अत्यंत फिकी असते तुम्ही तिखट शेवचा सुद्धा वापर करू शकतात.

भाजीची चव फक्त अजून झणझणीत होईल… तुमच्याकडे जी शेव उपलब्ध आहे त्या शेवचा तुम्ही वापर करू शकता फक्त जाड शेवचा वापर करा…)

घाला आणि पुन्हा एक उकळी येऊन गॅस बंद करा…

आपण ही शेवभाजी पोळी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतो. आपली गरमागरम शेव भाजी तयार झालेली आहे….
चला तर मग खानदेश स्पेशल मसालेदार शेव भाजी झणझणीत अशी…..

टिप्स::: मसाले भाजी करताना चटणी चांगली बारीक करून घ्या… म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित तयार होईल… चटणी तयार करण्यासाठी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे आणि तिखटाचा सुद्धा वापर केलेला आहे…. त्यामुळे भाजीला अत्यंत लाल असा रंग येतो आणि आपली तरी तयार होते भाजी शिजू देताना आपण अर्धवट झाकण ठेवावे म्हणजे भाजीला चांगला तवंग येतो…

वेळ व परिमाण::

तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:४ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

6436

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.