ओरिओ शेक

by Vaishali Chaudhari
191 views

ओरिओ शेक


प्रस्तावना::


ओरिओ शेक हे सध्या प्रचलित असलेले प्यायचे पेय आहे. जे की लहान मुलांना अत्यंत प्रिय आहे. परंतु बाहेर जाऊन पिण्यापेक्षा घरी बनवलेले पेय कधीही चांगले. कारण आपण वापरलेल्या वस्तू या कोणत्या दर्जाच्या आहेत हे आपणास माहीत असते.

साहित्य::


*एक ग्लास दूध

*दोन बिस्कीटचे ओरिओचे पुडे

* अर्धी वाटी साईची क्रीम

* दोन चमचे साखर

कृती::

एका पातेल्यात एक ग्लास दूध गरम करून दोन ते तीन तास फ्रीजमध्ये थंडगार होण्यास ठेवा.

दोन ओरिओ बिस्किटचे पुडे घ्या. पांढरा रंगाची क्रीम बाजूला काढा. दोन बिस्किटे गार्निशिंग साठी बाहेर काढून ठेवा.

उरलेले बाकी बिस्किटे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पूड करा.

आता त्या फुड मध्ये दोन चमचे साखर घाला पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या.

आता त्यामध्ये आपण बाजूला काढलेली ओरिओची पांढरी क्रीम तसेच साईची अर्धी वाटी क्रीम घालून चांगले मिक्सरला फिरवून घ्या.

सर्वात शेवटी त्यामध्ये एक ग्लास दूध घालून हे सर्व मिश्रण चांगले मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

एका हँडलच्या कपामध्ये चॉकलेट सिरप आजूबाजूने पसरवून घ्या. ते मी फोटोमध्ये दाखवलेलेच आहे.

आता त्यामध्ये आपण तयार केलेले ओरिओ चे मिश्रण घाला. त्यावर गार्निशिंग म्हणून एक आपण ठेवलेले बिस्किट घाला.

एका बिस्किटाला थोडा बारीकसा कट घालून साईडला तुला असा जातो बिस्कीट लावा. आता आपला ओरिओ शेक पिण्यास तयार झालेला आहे.

लहान मुलांना हा ओरिओ शेक अत्यंत आवडतो. यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये घालताना त्यामध्ये चॉकलेट सिरपही घालू शकतात. त्यामुळे दार चॉकलेटचा फ्लेवर निर्माण होईल. किंवा त्यामध्ये डेरी मिल्क कॅडबरीचे तुकडे करूनही तुम्ही घालू शकतात.

टिप्स::

ओरिओ शेक करताना आपण त्यातली पांढरी क्रीम ही वेगळी केली आहे कारण एकचदा वाटताना कधी पण त्याचा गोळा तयार होईल आणि बिस्किटांची पावडर ही व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून पांढरी क्रीम ही वेगळी करून आधी बिस्किटांचा चुरा करून घ्यावा.

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: २० मिनिटे
परिमाण: १ मुलासाठी

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7583

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.