घरगुती सामानामध्ये झटपट तयार होणारा असा चिवडा

by Vaishali Chaudhari
0 views

घरगुती सामानामध्ये झटपट तयार होणारा असा चिवडा


प्रस्तावना:::

उन्हाळ्यामध्ये मुलांना दुपारी छोटीशी भूक लागते.. त्यासाठी हा झटपट चिवडा आपल्याला बनवता येईल…


साहित्य::

  • एक मोठी वाटी पोहे
  • एक मोठी वाटी मक्याचे पोहे
  • दोन मोठे वाट्या मुरमुरे
  • बारीक शेव
  • अर्धी वाटी डाळ्या
  • आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
  • तळण्यासाठी तेल
  • जिरे, मोहरी
  • तिखट
  • मीठ
  • हळद
  • चाट मसाला
  • हिंग पावडर


कृती:::’


सर्वात आधी आपण मक्याचे पोहे तळून घेऊ… कढईमध्ये कडकडीत असे तेल गरम करा… तेल गरम झाल्यानंतर मग त्याचे मक्याचे पोहे थोडे थोडे करून तळून घ्या..

एका मोठ्या टगारीमध्ये काढा… मक्याचे पोहे तळल्यानंतर आपल्याकडे जे बटाट्याचे फ्रायम आहे ते तळून घ्यायचे आहे…

इथे तुमच्याकडे नसल्यास तरी चालेल… तुमच्याकडे बटाट्याचा वाळलेला कीस असेल तर तो तुम्ही तळून घेऊ शकता…

आता आपल्याला बटाट्याचे फ्रायम आणि मक्याच्या पोह्यांवर हळद तिखट आणि मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचे आहे…

त्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता शेंगदाणे आणि डाळ्या तळून घ्यायचे आहे… हे तिने साहित्य मक्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे …

यामध्ये सुद्धा थोडे तिखट मीठ आणि हळद घालायचे आहे… आता कढईमध्ये जास्त तेल असल्यास ते काढून घेऊ…

त्यामध्ये जिरे मोहरी घाला हळद आणि तिखट घाला.आणि साधे पोहे भाजून घ्या.. साधे पोहे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.. …

साधारण मंद आचेवर चार ते पाच मिनिटे आपल्याला पोहे परतण्यासाठी लागणार आहे. . त्यानंतर हे परतलेले पोहे आपल्याला मक्याच्या पोह्यांच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे…

त्यानंतर पुन्हा कढईमध्ये थोडे तेल घालून हळद आणि तिखट मीठ घालून मुरमुरे परतून घ्यायचे आहे… आणि हे मुरमुरे मक्याचे पोह्यांच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे….

हे सर्व साहित्य घातल्यानंतर वरून चाट मसाला थोडी हिंग पावडर भुरभुरा…. त्यानंतर त्यामध्ये बारीक शेव घाला…

तुमच्याकडे बुंदी सुद्धा असली तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता…. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या…आपला कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे.


टिप्स:::

पोहे हे मंद आचेवरच परतायचे आहे.. नाहीतर ते वात ळ राहिले तर चिवडा पण नरम पडेल…


वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ :५मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण::: साधारण अर्धा किलो चिवडा

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7517

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.