चिंचेचे लोणचे Tamarind Pickle इमली का खट्टा,चटपटा , तीखा, मसालेदार अचार#

by Vaishali Chaudhari

चिंचेची आंबट गोड चटपटीत लोणचे
प्रस्तावना:: आपण कैरीचे लिंबाचे मिरचीचे हळदीचे लोणचे तर नेहमीच खातो आज आपण एक आगळीवेगळी रेसिपी पाहणार आहे ती म्हणजे चिंचेचे आंबट गोड लोणचे चला तर मग आपल्या तोंडाला पाणी सुटलेच असेल आपण रेसिपी बघून घेऊ……
साहित्य:: वीस ते पंचवीस चिंचा(१०० ग्रॅम )एक वाटी गूळ एक चमचा तिखट एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा धनापूड एक चमचा जिरेपूड एक चमचा चाट मसाला एक चमचा लोणच्याचा मसाला दोन ते तीन पळ्या फोडणीसाठी तेल

कृती::
चिंचांचे साल काढून सर्व चिंचा एकदम स्वच्छ करून घ्याव्या. चिंचांचे साधारण दोन दोन तुकडे करावे. दोन दोन चीनचा राहतील याप्रमाणे तुकडे करावे. त्यानंतर त्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्या. चिंचा धुतल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करावे त्यामध्ये गूळ घालून गुळ विरघळून घ्यावा. गुरु पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा धनापूर एक चमचा जिरेपूड एक चमचा लोणच्याचा मसाला. घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ज्या चिंचा धुतलेल्या आहेत त्या चिंचा त्यामध्ये घालाव्या. आणि मंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनिटं शिजू द्यावा. म्हणजे आपण जो मसाला केलेला आहे तो चिंचांमध्ये व्यवस्थित मुरेल. आता दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसाला घालणार आहे. चाट मसाला घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिटं लोणचे शिजू द्या. आता लोणच्याचा गॅस बंद करा आपले आंबट गोड असे चिंचेचे लोणचे तयार झालेले आहे. यामध्ये लोणच्याचा घरगुती मसाला वापरलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बाहेरचा कुठलाही तुमच्या आवडीचा लोणच्याचा मसाला वापरू शकतात.


टिप्स:: इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर गूळ आवडत नसल्यास तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकतात प्रमाण सारखेच घ्यायचे आहे…. तसेच मी लोणच्याचा मसाला वापरलेला आहे त्यामुळे त्यामध्ये हिंग असतो म्हणून मी इथे व्यतिरिक्त हिंग टाकलेला नाही तुम्हाला जास्त हिंगाची चव आवडत असल्यास तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दोन चिमटी इतका हिंग तेलामध्ये घालू शकतात….

वेळ व परिमाण
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: १ व्यक्तीसाठी

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

5667

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.