उपासाची बटाट्याची भाजी

by Vaishali Chaudhari

उपासाची बटाट्याची भाजी


प्रस्तावना::

बटाट्याची भाजी ही लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीची भाजी आहे आणि उपवासाला चालणारी देखील आहे.


साहित्य::

पाच ते सहा उकडलेले बटाटे

आठ ते दहा बारीक हिरव्या मिरच्या

एक चमचा जिरे

अर्धी वाटी शेंगदाणे

मीठ

तेल

पाणी


कृती::

बटाटे पाणी घालून कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या घेऊन उकडून घ्या. बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्या .

आणि त्याचे काप करून घ्या. काप केल्यानंतर मिरचीचेही मधून चिरून बारीक काप करून घ्या. कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या..

शेंगदाण्याचे साल काढून घ्या.. मिक्सर मधून त्याचे जाडसर कूट करून घ्या किंवा भरडा करून घ्या.. कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा.

तेल आपल्या आवडीप्रमाणे घालावे इथे मी दोन ते तीन चमचे तेलाचा वापर केलेला आहे.

त्यामध्ये एक चमचा जिरे घाला. जिरे चांगले तडतडले की मग त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या घाला.. चांगल्या तांबूस रंगावर परतून घ्या.

तुम्हाला कडीपत्ता आवडत असल्यास तुम्ही कढीपत्ता सुद्धा घालू शकतात..मिरच्या तांबूस झाल्या की मग त्यामध्ये बटाट्याचे काप घाला.

बटाट्याचे काप तुम्हाला हव्या त्या आकारांमध्ये तुम्ही कापू शकतात. बटाटे घातल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

चवीप्रमाणे मीठ घातले की मग त्यावर झाकण ठेवा आणि भाजी भाजी चांगली पलटून पलटून खरपूस रंगावर परतून घ्या.

त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घाला. आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे भाजी चांगली खरपूस परतून घ्या.

खरपूस म्हणजे भाजीला सुद्धा थोडा तांबूस रंग येतो. त्यामुळे चव अत्यंत छान लागते.. भाजी चांगली खरपूस परतली की मग गॅस बंद करा.

इथे मी मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडे तिखटही घालू शकतात… आपली झणझणीत अशी उपासाची बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे…


टिप्स::

भाजी करताना त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट अवश्य घाला त्यामुळे चव एकदम सुरूस लागते…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ ::१०मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे परिमाण ::दोन व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

5285

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.