मुंबई स्टाईल पाणीपुरी चा रगडा

by Vaishali Chaudhari
1 views

मुंबई स्टाईल पाणीपुरी चा रगडा


प्रस्तावना::

मुंबईमध्ये गेल्यानंतर पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला नाही तर आपण काही एन्जॉय केले नाही असे होते… मुंबईची पाणीपुरी म्हणजे आहाहा….!!! आणि त्यातला गरमागरम रगडा!!!!! आम्ही तर सर्वप्रथम मुंबई केल्यानंतर पाणीपुरीचा आस्वाद घेतो……


साहित्य:::

  • दोन मोठे बटाटे
  • एक वाटी वाटाणे रात्रभर भिजवलेले
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • दोन चिमूट सोडा
  • एक पळी तेल
  • चवीप्रमाणे मीठ


कृती:::

सर्वप्रथम रात्री वाटाणे पाण्यामध्ये भिजत घाला.. साधारण आठ ते दहा तास भिजतील असे वाटाणे आपल्याला घालायचा आहे…

त्यानंतर सकाळी वाटाणे कुकरमध्ये घालताना धुवून घ्यायचे आहे… धुतल्यानंतर बटाटे सोलून घ्या… बटाट्याची साल काढून घ्या आणि त्याचे काप करून घ्या…

आता कुकरमध्ये वाटाणे आणि चिरलेले बटाटे बुडतील इतपत दीड ते दोन ग्लास पाणी घाला… त्यामध्ये पाव चमचा हळद एक पळी तेल दोन चिमूट इतका सोडा घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या….

आता हे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर साधारण पाच ते सहा शिट्ट्या कुकरच्या होऊ द्या… पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचा गॅस बंद करा…

कुकरची वाफ निघाल्यानंतर कुकर उघडून घ्या आणि आपला वाटाणा शिजला आहे का ते पकडून घ्या… वाटाणा अगदी मऊ शिजलेला असेल…

त्यानंतर स्मॅशरच्या साह्याने बटाटा आणि वाटाणा स्मॅश करून घ्या.. त्यामध्ये पुन्हा एक ग्लास उकडलेले पाणी घाला…

आता पाणी चांगले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि अर्धा चमचा तिखट घाला….

तिखट घातल्यानंतर हा रगडा चांगल्या पाच ते सहा उकड्या येईपर्यंत शिजू द्या… आणि रगडाचा गॅस बंद करा…

आपला पाणीपुरी मधील मुंबई स्टाइल रगडा तयार झालेला आहे.. हा रगडा सर्व्ह करताना गरम गरम सर्व्ह करावा…

पाणीपुरी मध्ये हरवला अत्यंत छान लागतो… शिवाय या रव्याचा वापर रगडा पापडी चाट मध्ये केला जातो… तिथे रगडा चाट म्हणून याचाच वापर केला जातो….


तर एन्जॉय करूया पाणीपुरी गरमागरम रगडा!!!!


टिप्स:::

रव्यातील वाटाणे चांगले शिजण्यासाठी आपण इथे सोड्याचा वापर केलेला आहे.. तुम्हाला सोडा वापरायचा नसल्यास तुम्ही कुकरच्या शिट्ट्या दोन शिट्या अजून जास्त घेऊन घ्या…

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8068

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.