हॉटेल स्टाईल गोड आंबट असा सांबर

by Vaishali Chaudhari
0 views

हॉटेल स्टाईल गोड आंबट असा सांबर


प्रस्तावना::

सांबर हा इडली सोबत तसेच डोशा सोबत तसेच उत्तप्पा सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाल्ला जातो…. इडली ने सांबारामध्ये पोहोता आले पाहिजे… असा आपला सांबर हवा….


साहित्य:::

  • अर्धी वाटी तुरीची डाळ
  • एक बटाटा
  • एक कांदा
  • एक टमाटर
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • कोथिंबीर
  • पाव वाटी चिंचेची चटणी
  • पाव चमचा हिंग
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा धनापूड
  • दीड चमचा सांबर मसाला
  • चवीप्रमाणे मीठ
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • दहा ते बारा शेंगदाणे


कृती:::

तुरीची डाळ धुऊन घ्या.. त्यानंतर बटाटा सोलून घ्या… मी बटाटा कापून घ्या… टोमॅटो की कापून घ्या… कुकरमध्ये तुरीची डाळ बटाटा टोमॅटो दोन तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या….

यामध्ये सुद्धा घालू शकतात शेवग्याच्या शेंगा वाटाण्याची दाणे एक ते दोन गंगाफळाचे फोड घालू शकतात…. एक कांदा बारीक चिरून घ्या…

अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्या… कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालून त्यामध्ये शेंगदाणे आणि कढीपत्ता घाला ……

लगेचच कांदा घाला आणि परतवून घ्या…. कांदा तांबूस रंगावर आला की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला…. तेच घातल्यानंतर हिंग घाला…

. पाव चमचा हळद एक चमचा तिखट दीड चमचा सांबर मसाला अर्धा चमचा धनापुड पाव चमचा हळद घालून मिश्रण चांगले परतवून घ्या…

आता यामध्ये चिंचेचा कोळ घाला.. म्हणजे चिंचेची गोड आंबट अशी चटणी घाला…. घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या…

आपल्या कुकर ची वाफ निघाली की वरण रवीच्या साह्याने लोणून घ्या… त्यानंतर हे मिश्रण केलेल्या फांद्याच्या चटणी मध्ये परतवा…

यामध्ये थोडे गरम पाणी घाला आणि सांबर पातळ करा… आणि मिश्रणाला दोन ते तीन उड्या येऊ द्या… त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि त्याचा पुन्हा उकडा येऊ द्या.. आपला सांबर तयार झालेला आहे…

हा सांबार तुम्ही इडली सोबत डोश्यासोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतात… गरमागरम सांबार तयार झालेला आहे….

टिप्स:::

सांभार तयार करताना त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकतात….. इथे तुमच्याजवळ चिंचेची चटणी नसल्यास दोन ते तीन चिंचा भिजत घालून ते पाणी घालावे आणि गुळाचा तुकडा घालावा…..


वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::५ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8089

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.