गरमागरम नाश्त्यासाठी उपमा

by Vaishali Chaudhari
0 views

गरमागरम नाश्त्यासाठी उपमा


प्रस्तावना:::

अडचणीसाठी गरमागरम काय करावे असा पण विचार करत असतो!!! अशा वेळेस गरमागरम उपमा हा सगळ्यांना आवडणारा मेनू आहे…. आणि झटपट तयार होणारा मेनू आहे… एक महा रव्यापासून तयार केला जातो त्यासाठी तुम्ही घरगुती रवा सुद्धा वापरू शकता किंवा दुकानातला रवा सुद्धा वापरू शकतो….


साहित्य:::

  • दोन वाटी रवा
  • एक मोठा कांदा
  • एक मोठा टोमॅटो
  • सात ते आठ हिरव्या मिरच्या
  • आठ लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • बारा ते तेरा कडीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • वीस ते पंचवीस शेंगदाणे
  • दोन चमचे साजूक तूप
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • चवीप्रमाणे मीठ
  • पाणी


कृती:::

सर्वप्रथम कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून रवा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्या… रवा चांगला तांबू संपावर भाजल्यानंतर तो एका डिशमध्ये काढून घ्या…

त्यानंतर कढईमध्ये तेल घाला त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला मिरच्या शेंगदाणे घाला त्यानंतर कांदा घाला..

आता पाव चमचा हिंग घाला…कांद्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या.. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला आणि टोमॅटो घाला पुन्हा व्यवस्थित परतून घ्या..

आता यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घाला.. आणि व्यवस्थित परतवून घ्या… सर्व मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवलेला आहे तो घाला…..

आणि व्यवस्थित एकसंध करा….. दुसऱ्या साईडला मोठे दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा…. इथे मी दोन वाटी रव्यासाठी मोठे दोन ग्लास पाण्याचा वापर करत आहे…

तुम्हाला रवा घट्टसर हवा असेल तर तुम्ही दोन ग्लासचाच वापर करा…रवा एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये गरम उकडते पाणी घाला…..

रव्यावर झाकण ठेवून द्या…. दोन ते तीन मिनिटे चांगली वाफ आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला….

त्यानंतर चवीप्रमाणे मीठ झाल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्या… पुन्हा दोन ते तीन मिनिटे रवा चांगला वाफवून घ्या…

त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला… आणि एक ते दोन वाद आल्यानंतर गॅस बंद करा… आपल्या माता तयार झालेला आहे….

उपमा तयार करताना तुम्हाला उपमा किती मऊ हवा त्याप्रमाणे तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे… आता आपल्या गरम गरम उपमा तयार झालेला आहे….

त्यावर कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा…. गरमागरम उपमा!!!!


टिप्स:::

उपमा करताना पाण्याचा वापर किती करावा हा प्रश्न पडतो.. बारीक रवा असल्यास एका वाटीला एक ग्लास पाणी पुरेसे असते…


वेळ आणि परिमण::


तयारी ची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:: ५जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10288

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.