कलाकंद: बेरी पासून तयार होणारा

by Vaishali Chaudhari
4 views

बेरी पासून तयार होणारा कलाकंद


बेरी पासून तयार होणारा कलाकंद


प्रस्तावना:::

घरामध्ये दूध तर सर्वांच्याच असते आणि प्रत्येक जण त्याची साय काढत असतो… त्यापासून तू बनवत असतो ज्याला आपण गावराणी तूप म्हणतो आणि… अत्यंत सुगंध देणाऱ्याचे गावराणी तूप आणि तूप तयार करत असताना शिल्लक राहणारी बेरी त्याचे काय करायचे.. सर्वजण की बाहेर टाकून देतात.. पण त्यापासून अत्यंत चविष्ट असा पदार्थ तयार होतो…


साहित्य::

  • एक मोठी वाटी बेरी
  • अर्धी वाटी गूळ
  • एक वाटी दूध
  • एक ते दोन वेलदोडे


कृती::

एक वाटी च्या आसपास आपण बेरी घेऊ बेरी सर्वप्रथम कढई गरम करून सर्व काढून घेऊ… त्यानंतर त्यामध्ये एक वाटी इतके दूध घालू आणि अर्धी वाटी इतका गूळ घालू…

दूध आणि गूळ आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचे आहे… जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत सतत मिश्रण ढवळत राहायचे आहे…

त्यानंतर त्याला घट्टपणा आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे… मी इथे एक वाटी दुधाचा वापर केला आहे…

इथे तुम्ही दोन वाटी दुधाचा सुद्धा वापर करायचा करू शकतात परंतु दूध आठवण्यास थोडा वेळ लागेल मात्र चव एकदम आणखीन उत्तम लागेल…

यामध्ये वेलदोडे घालायचे आहे.. मी तुपामध्ये ऑलरेडी वेलदोडा घातलेला असल्यामुळे मी या मिश्रणामध्ये वेगळा असा वेलदोडा घालणार नाही…

तुम्ही तूप करत असताना वेलदोडा घातला नसेल तर तुम्ही इथे एक किंवा दोन वेलदोड्याची पूड घालू शकता…

आता हे आटलेले मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे… त्यानंतर फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी ठेवायचे आहे…

अर्धा ते एक तास झाल्यानंतर आपला कलाकंद सेट झालेला असेल… आता हा कलाकंद डिश उलटी करून काढून घ्या… आणि त्याच्या छान स्लाईस पाडा… चवदार असा गावराणी तुपाचा कलाकंद तयार झालेला आहे….


टिप्स::

दूध आठवताना गॅसचे आज मंद ठेवा नाहीतर मला पण जळून जाईल आणि जळकट चव लागेल…


वेळ व परिमाण
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

9956

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.